Saturday, May 2, 2009

"मंदी' चल हट... (सकाळ)

जागतिक मंदीचा अमेरिकेकडून कांगावा
सकाळ वृत्तसेवा
Saturday, May 02nd, 2009 AT 2:05 PM
Tags: jalgaon, recession, lecture
Close...
जळगाव, ता. १ - जागतिक मंदी वेगवेगळ्या अंगाने भिडत राहणार असली तरी आपल्याकडे जागतिक मंदी नाही. आपल्या देशाचा विकासाचा दर सहा टक्के आहे. विकासाचा दर नऊ टक्‍क्‍यांवरून सहा-सात टक्‍क्‍यांवर येतो त्याला आपण मंदी असे म्हणतो. मुळात इतर देशांत तो वजा दोन इतका आहे, त्यामानाने भारतात आपल्याकडे मंदी नाहीच; उलट भारताची महासत्तेकडे वाटचाल सुरू आहे.
जागतिक मंदीचा अमेरिकेकडून कांगावा केला जात आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ तथा नॅशनल सिक्‍युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड'चे (एनएसडीएल) कार्यकारी उपाध्यक्ष चंद्रशेखर टिळक यांनी येथे केले.
"सकाळ' आणि रोटरी क्‍लब ऑफ जळगाव वेस्ट तर्फे "जागतिक मंदी आणि आपण' या विषयावर येथील मायादेवीनगरातील रोटरी हॉलमध्ये श्री. टिळक यांचे आज सायंकाळी व्याख्यान झाले. यावेळी व्यासपीठावर रोटरी क्‍लब ऑफ जळगाव वेस्टचे अध्यक्ष अरुण नंदर्षी, शरद राठी, "सकाळ'च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक विश्वास देवकर उपस्थित होते.
श्री. टिळक म्हणाले की, अमेरिका, युरोपात जशी मंदी आहे तसे कुठलेही वातावरण आपल्याकडे नाही. याचे कारण भारताने गेल्या सतरा- अठरा वर्षात केलेली आर्थिक प्रगतीत आहे. तरीही भारतातील अनेक कंपन्या जागतिक मंदीच्या कार्पेटखाली नोकर कपात व आपली अनेक पापे लपविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मंदीचा परिणाम सेवा सेक्‍टरवर तरी नक्कीच नसतो. मंदी आहे, असे आपल्याकडे भासविले जात असेल तर मग रस्त्यावर दुचाकी, चारचाकींची गर्दी का वाढते?, "नॅनो' गाडीचे साडेतीन लाखांचे बुकिंग का होते?, "म्हाडा'च्या घरांसाठी अर्जांची विक्रमी नोंदणी का होते?, बॅंका नवनवीन शाखा का उघडत आहेत ?, रेल्वेचे तीन महिन्यांपूर्वींचे आरक्षण बुकिंग तीन महिन्यानंतरही वेटींगच का राहते?, या सर्व प्रश्‍नांची उत्तरे आपण स्वतःलाच विचारली तर जागतिक मंदी कुठे आहे?, असा प्रश्‍न साहजिकच पडेल.
तसेच मंदीचा बागुलबुवा केला जात असेल तर मग बाजारातील वस्तूंच्या किंमती स्वस्त का झाल्या नाहीत? असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला. सध्याच्या जागतिक मंदीत खंबीर राजकीय भूमिका घेणे अतिशय गरजेचे आहे. आर्थिक धोरणात सामंजस्य ठेवल्यास मंदी ही गुंतवणुकीसाठी संधी ठरू शकेल, असेही श्री. टिळक म्हणाले.

मंदीची झळ दीड वर्षानंतर शक्‍य
जागतिक मंदीचे सामाजिक परिणाम देशावर होत असून, दिसायला मंदी हा जरी आर्थिक घटक असला तरी राजकारणात बदल होऊ शकतात. जागतिक मंदीची चर्चा केली जाते याचा विचार करण्याची गरज आहे.
जागतिक मंदीचा भारताशी संबंध आहे, असे जर म्हटले तर मंदीत दर खाली यायला हवे, पण तसे झाले नाही. डॉलर कमी होत नाही तोपर्यंत मागणी टिकून आहे. मध्यमवर्गीयांचे राहणीमान बदलत नाही तोपर्यंत सामाजिक, आर्थिक बाबीही बदलणार नाहीत. म्हणूनच इतर देशांच्या तुलनेत आपल्याकडे तूर्त तरी मंदी नाही. मंदीचा परिणाम जाणवण्यास साधारणतः एक ते दीड वर्षाचा कालावधी लागेल.
मात्र, तोपर्यंतचा काळ हातात असल्याने मंदीवर मात करण्यासाठी धोरणे राबवायला हवी. मंदीच्या भीतीने हात गाळून बसण्यापेक्षा हातात आहे त्या संधीचे सोने करायला हवे, असेही ते म्हणाले.
शेअर बाजारात कधी नव्हे एवढे चढ-उतारच अचानक येतात. याचा अर्थ जागतिक मंदी असा नव्हे, असे सांगून श्री. टिळक म्हणाले, ""सध्या ऑईलची मागणी कमी झालेली नाही. १८ भारतीय कंपन्यांनी ११८ अमेरिकन कंपन्यांशी पूर्ण डॉलरचा मोबदला देऊन करार केला आहे.
या बाबी मंदी नसल्याचे द्योतक आहेत. समाजव्यवस्थेमध्ये लिक्विडिटी आणि प्रॉफिटॅबिलिटी या दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात. मात्र या दोन्ही गोष्टी स्वतंत्र आहेत, ही बाब ध्यानात घ्यावी लागेल. सध्याच्या स्थितीचा आपण सक्षम देश म्हणून योग्य उपयोग केला, तर येत्या २०२० पर्यंत महासत्ता बनण्याचा हक्क आपल्याला आहे, असे सांगून त्यांनी १९२९ ची आर्थिक मंदी आणि आताची स्थिती यातील फरक विविध उदाहरणांसह स्पष्ट केला.

दहशतवादाचा परिणाम अमेरिकेत मंदी
जागतिक मंदी आणि दहशतवाद हे एकमेकांशी निगडित आहे. दहशतवाद हा सामाजिक असला तरी अमेरिकेतील मंदी हे त्याचे परिणाम आहे. प्रसारमाध्यमे आणि विचारवंत यांनी विचार न करताच यावर चर्चा केल्या आहेत. अमेरिकेला आर्थिक दृष्टिकोनातून भीती वाटते. युद्ध ही अमेरिकेची आर्थिक व सामाजिक गरज आहे.
अमेरिकेसारखा देश व्हिएतनामशी युद्ध करतो, म्हणजेच यातून भारताला दहशत मिळाली पाहिजे, असा अर्थ आहे. मुंबईवर झालेला २६ नोव्हेंबर २००८ चा दहशतवादी हल्ल्यामागे भारताची आर्थिक विकासात होणारी प्रगती हेच यामागील कारण होते, असे टिळक म्हणाले. शेवटी त्यांनी जागतिक मंदीशी निगडित नागरिकांनी विचारलेल्या प्रश्‍नांची उत्तरे दिली.
रोटरी क्‍लब ऑफ जळगाव वेस्टचे माजी अध्यश्र गनी मेमन यांनी सूत्रसंचालन केले व व्याख्यानाच्या विषयामागची पार्श्‍वभूमी विशद केली. कार्यक्रमाचे प्रायोजक दी वसंतस्‌ सुपरशॉपचे संचालक तथा रोटरीचे प्रकल्प संचालक नितीन रेदासनी यांनी प्रमुख वक्ते अर्थतज्ज्ञ टिळक यांचा परिचय करून दिला. "सकाळ' च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक श्री. देवकर यांनी प्रास्ताविक केले.
"मंदी' चल हट..
भारताचा विकासदर वाढता आहे. दरडोई उत्पन्न वाढले आहे. गुंतवणुकीपेक्षा बचतीचा दर जास्त असलेला जगातील एकमेव देश म्हणून भारताचे नाव अग्रक्रमावर आहे. आजही आपल्याकडे गुंतवणुकीसाठी पैसा आहे. त्यामुळे भारतावर जागतिक मंदीला सामोरे जाण्याची वेळ येणार नाही. "मंदी' चल हट.. असेच काहीसे भारतातील वातावरण आहे, असेही श्री. टिळक म्हणाले.

Tuesday, January 8, 2008

अंगठी अनामिकेतच का?

अंगठी अनामिकेतच का?


विवाह निश्‍चित झाल्याची खूण म्हणून वाग्‌दत्त वधू आणि वर एकमेकांच्या अनामिकेत अंगठी घालतात. ही अंगठी अनामिकेतच का घालतात? दुसऱ्या बोटात का नाही घालत?
एका चिनी तत्त्ववेत्त्याची ही एक सुरेख मांडणी पाहा. .........
त्याच्या मते, आपला हात म्हणजे दहा बोटे. हे एक कुटुंब. त्यातील अंगठा हे आपल्या आई-वडिलांचे प्रतीक. अंगठ्याजवळचे बोट आपल्या भावंडांचे प्रतीक. मधले बोट म्हणजे आपण स्वत-. चौथे अनामिका... म्हणजे आपला जोडीदार, तर करंगळी म्हणजे आपली अपत्ये.

ही झाली गृहीतकं. आता पाहू या कुटुंबातील या घटकांशी आपली नाती कशी आहेत ती.

हाताचे तळवे नमस्काराप्रमाणे जोडा. मधली बोटे दुमडून बाकी बोटांची फक्त वरची टोकं जुळवा.

आता प्रथम अंगठे एकमेकांपासून दूर करा. ते उघडता येतील. कारण आई-वडील काही जन्मभर लाभत नाहीत. कधी ना कधी ते आपल्याला सोडून जातात.

अंगठे मिटवून त्याच्या शेजारील बोटे उघडा. तीही उघडतील. कारण त्यांना त्यांची कुटुंबं आहेत. स्वत-ची आयुष्यं आहेत.

आता ती बोटं जुळवून आपल्या करंगळ्या उघडा. त्याही उघडतील. कारण तुमची मुलं मोठी झाल्यानंतर घरटं सोडून भरारी घेणारच आहेत.

आता करंगळ्या मिटा आणि अनामिका एकमेकांपासून वेगळ्या करा. आश्‍चर्य वाटेल; पण त्या वेगळ्या होत नाहीत. कारण जोडीदार, म्हणजे पती-पत्नी आयुष्यभरासाठी एकत्र राहणार असतात. ते सुखात आणि दु-खातही एकमेकांना साथ देतात... आयुष्यभर!

म्हणून हेच बोट, हीच अनामिका लग्न ठरल्याची खूण म्हणून अंगठी घालण्यासाठी योग्य नाही का?

अंगठी अनामिकेतच का

-सकाळ वरुन

Tuesday, October 9, 2007

गतस्मृति...!

सध्या टिव्हिवर एक उद्वेगजनक जाहिरात लागते. कुठल्याश्या साबणाची. एक मुलगी (आता साबणाची जाहिरात आहे म्हणजे ती तरुण आहे हे सांगायला नकोच) 'मी आता उटण्याने स्नान करायला जाते' अशी घोषणा करते. त्यावर (तिच्या) घरातल्या सर्वांनाच धन्यधन्य वाटतं आणि तिची आजी येऊन तिची आरती करते! ही महान जाहिरात संपल्यावर आम्ही एकमेकांच्या चेहेर्‍यांकडे पाह्तो. सगळ्यांनाच ही जाहिरात पाहिल्याचा पश्चात्ताप झालेला दिसतो आणि आपसूकच पूर्वीच्या म्हणजे ऐंशी-नव्वदच्या सुमारातल्या जाहिरातींचा विषय निघाल्याशिवाय रहात नाही. घरात अलिकडे बर्‍याचदां हा दिषय छेडला गेला आणि भराभर एकेक जाहिराती, त्यांच्या कॅप्शन्स, जिंगल्स आणि पात्रांसकट आठवत गेल्या..एकामागोमाग एक. आणि मग आठवल्या तश्या लिहून ठेवाव्याश्या वाटल्या. काही शब्द चुकीचे असण्याची शक्यता आहे तेव्हा तुम्हाला ते माहित असतील तर जरुर सांगा.

दिल्ली दूरदर्शन आणि फ़ारतर डीडी मेट्रो एव्हढ्यातच टिव्हिचं विश्व सामावलेल्या तेव्हाच्या काळात मस्त सिरियल्स आणि जाहिराती असायच्या। सिरियल्स शिस्तीत १३ भागांमध्ये आटपायच्या. खरं तर त्यावेळच्या सिरियल्स हा एका स्वतंत्र लेखाचा विषय होऊ शकेल. बुनियाद, चुनौति, ये जो है जिंदगी, कच्ची धूप, खान्दान, फ़ौजी, उडान पासून ते आमच्या बालमनाला सुखावणार्‍या स्पायडरमॅन, विक्रम और वेताल, ही-मॅन, जंगल-बुक, डीडीज कॉमेडी शो, टेलिमॅचेस या सर्वांचे धागे जाहिरातींनी जोडले गेलेले असत. चाल, बोल, थीम या सर्वच अंगांनी परिपूर्ण असणार्‍या तेव्हाच्या जाहिराती कधीच संतापजनक किंवा अश्लिल वाटल्या नाहीत.

इलेक्ट्रिकल बल्ब आणि ट्युब्ज तयार करणार्‍या 'बजाज' ची जाहिरात मला सर्वात आवडायची। बाल्य, तारुण्य आणि वार्धक्य या तिन्ही स्टेजेस मधून आता सुमारे सत्तरीचे असलेले आजोबा सांगतात,
जब मैं छोटा बच्चा था
बडी शरारत करता था
मेरी चोरी पकडी जातीsssss
जब रोशन होता बजाज

क्या रंगीन जवानी थी
इक राजा इक रानी थी
राजा रानी शर्मा जातेsssss
जब रोशन होता बजाज

अब मैं बिल्कुल बुढा हूं
गोली खाकर जीता हूं
लेकीन आज भी घर के अंदरssss
रोशन होता बजाज

तशीच बजाज स्कूटरची जाहिरात। एकेक दृश्य त्यातलं इतकं भावणारं होतं आणि ओळीही चटकन लक्षात राहणार्‍या. "बुलंद भारत की बुलंद तसबीर...हमारा बजाज"

अजून एक गंमतीदार जाहिरात होती। ब्रिटानिया कोकोनट बिस्किटांची. त्या जाहिरातीचे बोल असे होते:
एक नारियल पेड से टूटा
गिरते ही वो बीचसे फ़ुटा
सेक कापकर उसे पकाया
खूब कुरकुरा उसे बनाया
ब्रिटानिया कोकोनट क्रंची

दुसर्‍या ओळीत नक्की काय शब्द होते आता आठवत नाहीत। पण शेवटी नारळ एका झटक्यात फ़ोडलेला दाखवायचे आणि आतमधून मस्त तयार गोल गोल बिस्किट्स बाहेर पडायची. आमच्या निरागस मनाला ते खरं वाटल्याने जेव्हा जेव्हा घरी नारळ फ़ोडला जायचा तेव्हा आतमधून तशीच बिस्किट्स बाहेर पडतील का असं वाटायचं.

परवा सुरभि बघताना अजून एक आवडती जाहिरात अचानक समोर आली। 'अमुल्या' ची. इतक्या वर्षांनी ती जाहिरात पाहताना इतकी मजा वाटली! तश्या अमूलच्या सर्वच जाहिरातींचा जवाब नाही पण ही जाहिरातसुद्धा छान होती. स्मिता जयकर किती यंग दिसतात यात!

वही कॉफ़ी वही चाय
पल मैं नया स्वाद जगायें...
अमूल्या..!
बस! यूं घुलमिल जाय
स्वाद निखारे
रंग जमाये..
अमूल्या...!

अमूलचं नाव निघालंच आहे तर अमूलच्या जिंगल्सची उजळणी झाली नाही तर या आठवणी अपूर्ण राहतील। चारोळींच्या साध्या सोप्या जिंगल्स छोटी मुलं म्हणतात वेगवेगळ्या प्रसंगी. अमूल श्रीखंड खाण्याचे हे प्रसंग कसे विसरता येतील!

मेहेमान जो आयेंगे
मौके मिल जायेंगे
जी भर के खायेंगे
अमूल श्रीखंड!

पार्टी मनायेंगे
सबको बुलायेंगे
जी भर के खायेंगे
अमूल श्रीखंड!

शादी मैं जायेंगे
बाजा बजायेंगे
जी भर के खायेंगे
अमूल श्रीखंड!

एरवी पान-तंबाखूचा कितिही तिटकारा असला तरी पानमसाल्याच्या जाहिराती कधीच चुकवल्या नाहीत। पानपरागची ती अशोक कुमार आणि शम्मी कपूरची जाहिरात विसरणं कसं शक्य आहे! त्यातले ते खास डायलॉग्ज.........

"सुनिये लडके के मा-बाप आये है" मुलीची आई किंवा कोणीतरी म्हणतं।

"आयिये आयिये॥" नेहेमीच स्वागत समारंभ।

" बारा्त ठिक आठ बजे पहूच जायेगी। लेकिन हम आपको एक बात कहना तो भूल ही गयें! " शम्मी कपूर।

सर्वजण टेन्शनमध्ये एकमेकांकडे बघतात। लगेच शम्मी कपूर पुढे,

"घबराइये नही! हमें कुछ नही चाहिये। हम तो सिर्फ़ इतना चाहते हैं की आप बारातियों का स्वागत पानपराग से किजीये।"

हे ऐकल्यावर रिलॅक्स झालेले अशोक कुमार पानपराग हळूच काढून म्हणतात,

"ओह हमें क्या मालूम आप भी पा्नपराग के शौकीन हैं! ये लिजिये पानपराग!"

पान-पराग पानमसाला॥ पान पराग!!

पिक्चर पहायला बाहेर थिएटरमध्ये गेल्यावर सिनेमा सुरु व्हायच्या आधी दोन जाहिराती लागल्याशिवाय सिनेमा सुरु होत नसे। एक ही पान-परागची आणि दुसरी विकोची 'कुदरत' वाली लांबलचक जाहिरात. त्यापैकी पान-परागचं 'लेकीन हम आपको एक बात कहना तो भूल ही गये' हे वाक्य आमच्या मित्रमंडळीत अजूनही वापरलं जातं.

दुसरी एक 'पान-पसंद' ची जाहिरात लागायची। छोटी आणि छान. पान-पसंद खाल्यावर माणसाचा मूड कसा बदलू शकतो ते अर्चना जोगळेकर मस्त दाखवायची, आधी रागात येऊन:

"शादी? और तुमसे? उफ़! (इथे ती सॉलिड नाक मुरडते ते शब्दांत लिहिणं कठीण आहे।) कभी नही!"
आणि मग पान-पसंद खाऊन ती तेच वाक्य लाडात म्हणते। :))

पान-पसंदचीच मला वाटतं भारती आचरेकरांचीही जाहिरात होती। त्याचे शब्द नेमके नीट आठवत नाहियेत. "मुझे गुस्सा मत दिलाओ...अपनी बीबीपर हुकुम चलाते हो?" असं काहिसं त्या प्रथम रागात आणि नंतर मऊपणे म्हणतात. :)

डाबरच्या जाहिरातीत अमिताभ असणं आता अपरिहार्य झालेलं असलं तरी त्यामुळे डाबरची पूर्वीची ही जाहिरात मी कधीच विसरु शकणार नाही। एक टिपीकल हिंदी मिडियम स्कूल आणि तीच खाकी कलरच्या गणवेशातली मुलं वगैरे. वर्गात फ़ळ्यावर मानवी दातांची आकृति काढली आहे.

मास्टरजी: बच्चोंSSS ये है हमारी दातों की बनावट। राजू! तुम्हारे दात तो मोतियों जैसे चमक रहे हैं...
(मास्तरांचे दात अतिशय वाईट आहेत)
राजू: क्यों ना हो मास्तरजी! मैं डाबर का लाल दंतमंजन जो इस्तमाल करता हूं।

हल्लीच्या कुठल्याश्या टूथपेस्टच्या जाहिरातीत प्रत्येकाची दातांची कवळी तोंड उघडल्यावर कॅमेर्‍याच्या फ़्लॅशसारखी चमकताना दाखवली आहे। अतिशयोक्ती हा जाहिरातविश्वाचा अविभाज्य भाग मानला तरी इतकी अतिशयोक्तीही खटकते, खरं तर हास्यास्पद वाटते. टूथपेस्टने टूथपेस्टचं काम करावं, बल्बचं नाही. म्हणून टूथपेस्टची जाहिरातही टूथपेस्टचीच वाटली पाहिजे आणि बल्बची जाहिरात बल्बचीच. बल्बवरुन आठवली जुनी ECE बल्बज आणि ट्युब्जची जाहिरात. एका गृहस्थाला बायको, शेजारीपाजारी सर्वजण ECE बल्ब आणण्याची पावलापावलावर आठवण करुन देतात.

"भूल न जाना
ECE बल्ब लाना
बाबाबा बल्ब...
ज्यादा दे उजाला
दिनोंदिन चलनेवाला
ECE bulb and ECE tube!

जावेद जाफ़रीच्या 'सिनकारा'ची जाहिरात 'ऑल टाईम फ़ेवरीट' प्रकारात मोडते। या जाहिरातीचे बोल आजही ऑफ़िसांमध्ये बोलले जातात यात शंका नाही.
"ये बेचारा
काम के बोझ का मारा
इन्हें चाहिये
हमदर्द का टॉनिक
सिनकारा"

किंवा 'कोल्डरीन' ची जाहिरातही ऑफ़िसमध्ये एखाद्याला सतावायला उपयोगी अशीच होती। एखाद्याचे हाल कामामुळे (खरं तर बॉसमुळे) बेहाल झालेले दिसले की त्याच्याभोवती कोंडाळं करुन त्याला अजून त्रास द्यायचा.....

"ये क्या हाल बना रखा हैं"
"कुछ लेते क्यूं नही.."
मग शेवटी एकासुरात,
"कोल्डरीन ली?"

जाहिरातींचा विषय 'निरमा'ची आठवण निघाल्याशिवाय पूर्ण होऊच शकत नाही। सर्व वॉशिंग पावडरी, साबण बार यांची राणी म्हणजे निरमा. काळानुसार अवतीभवती कितीही बदल झाले तरी निरमाची फ़्रॉकातली मुलगी गोल फ़िरायची काही थांबली नाही. नाही म्हणायला निरमाच्या जाहिराती बदलत गेल्या पण निरमाचे "निरमा...निरमा, निरमा डिटर्जंट टिकिया, इसके झाग ने जादू कर दिया" हे बेसिक बोल विसरता येणार नाहीत. नंतरही दिपिकाची (म्हणजे रामायणातली सीता) 'निरमा सुपर' ची जाहिरात बर्‍यापैकी प्रसिद्ध झाली होती ज्यात दुकानदार तिला "मान गये" "किसे?" "आपकी पारखी नजर और निरमा सुपर, दोनोंको" अशी दाद देतो. साबणाचाच विषय निघालाय तर एक जाहिरात माझ्या डोक्यात फ़िक्स बसली आहे. पण ती रेडिओवर लागायची. मला वाटतं डबल बी किंवा अशाच काही नावाच्या साबणाची ती जाहिरात होती.

ये ढेर से कपडे मैं कैसे धोउं
अच्छा साबुन कौनसा लाऊ
कपडों को जो उजला बनायें
उम्र बढायें, चमक लायें
कोई बता दें, मुझकॊ कोई बतादें

दिवसातून एकदा तरी ह्या ओळी कानावरुन गेल्या नाहीत असं कधी झालं नाही। :)

खरंच तो काळ किती छान होता॥असं आता हजारदा वाटतं। निर्व्याज हास्याचा आणि निरागस बाल्याचा. संध्याकाळी खेळताना आवडत्या जाहिरातीचे सूर कानावर पडले की घरी धावत असू आम्ही. रविवार 'रंगोली' ने सुरु होऊन 'विक्रम वेताळ'सारख्या मालिकांनी अधिक रंगत जायचा. चिंता कधी केलीच तर दुसर्‍या दिवशी असणार्‍या शाळेची. त्यापलिकडे विश्वच कुठे होतं! टीव्हीचे हे दोनच चॅनेल्स आम्हांला पुरुन उरायचे. पण आता शंभर चॅनेल्सच्या गर्दीत हे दोन्ही हरवून गेलेत!!

पण अलिकडेच ऐकलं, 'व्योमकेश बक्षी' डीडी-१ वर परत सुरु केलंय म्हणे.......पहायला हवं....कदाचित त्याबरोबर जुन्या जाहिरातीसुद्धा लागतील।! :)

Monday, October 1, 2007

कुत्र्याचा पोपट ...

एकदा विमानातुन एक पोपट आणि एक कुत्रा प्रवास करत असतात. पोपट एअर होस्टेसला बोलावतो.
एअर होस्टेस येते, "येस सर?"
"काही नाही, काही नाही, तु जा परत...", पोपट म्हणतो. असे ३-४ वेळा होते.
कुत्रा हे सगळे बघत असतो. न राहावल्याने तो पोपटाला विचारतो,
"काय रे, हे काय चाललय??"
पोपट म्हणतो, "काय नाय रे.. असच... माज..."
कुत्रा विचार करतो, आयला! एवढासा पोपट आणि माज करतोय ???
मग कुत्राही असेच एअर होस्टेसला बोलावुन परत पाठवायला लागतो.
आणि पोपटाकडे बघुन म्हणतो, "असच... माज...!"
पोपट आणि कुत्र्याचे हे चाळे बघुन स्टाफ त्यांना तंबी देतो.
तरीही न रहावुन पोपट पुन्हा एकदा एअर होस्टेसला बोलावुन परत पाठवतो.
या वेळी कॅप्टन स्वत: येउन दोघांनाही परत तंबी देतो,
"पुन्हा असं घडलं तर आम्ही गंभीर दखल घेऊ..."
आता कुत्र्याला रहावत नाही. तो पुन्हा हाच प्रकार करतो.
शेवटी सगळा स्टाफ जमा होतो आणि ३०००० फुट उंचीवरुन
पोपट आणि कुत्रा - दोघांनाही विमानातुन खाली फेकुन देतात.
पडता-पडता पोपट कुत्र्याला विचारतो,
"काय रे, तुला उडता येतं का?"
"नाही रे" कुत्रा म्हणतो.
"मग? माज कशाचा करत होतास???"

Friday, September 28, 2007

बाळाचा मिस्ड कॉल ...

जन्माला येताक्षणी बाळानं नर्सला विचारलं," एक्स्क्युज मी! मोबाईल आहे का तुमच्याकडे?

" आहे रे बाळा! पण तुला कशाला हवाय?"

" मी सुखरुप पोहोचलोय म्हणून देवबाप्पाला मिस्ड कॉल द्यायला!!! "

Thursday, September 27, 2007

एक जाहिरात ... अफलातून !